सहावीत शिकणाऱ्या मुलाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले पत्र

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


शेतकऱ्यांच्या या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारे एक पत्र व्हायरल होत आहे. हिंगोलीमध्ये राहणाऱ्या प्रताप कावरखे या सहावीत शिकणाऱ्या मुलाने हे पत्र थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले आहे.

या पत्रामध्ये लिहिला आहे की, माझे बाबा शेती करतात. आपली शेतजमीन कमी आहे असे बाबा म्हणतात. मी बाबांकडे रोज खाऊसाठी हट्ट करतो, तेव्हा बाबा चिडून म्हणतात यावर्षी चांगले सोयाबीनचे पिक वाया गेले, आता शेती विकुन तुला खाऊसाठी १० रूपये देतो. आईने दसऱ्याला पोळ्यासुद्धा नाही केल्या. आई म्हणाली, ‘सोयाबीनचे पिक गेले त्यामुळे रोजचे जेवण बनवायला पैसे नाहीत, बाबा दुसऱ्यांकडे कामाला जातात.’ मी आईला म्हणालो आई तू दिवाळीला पोळ्या कर, तर ती म्हणाली, बँकेत अनुदान आले की पोळ्या करेन.’साहेब आमच्याकडे सणाला पोळ्याही बनत नाहीत. मी बाबांसोबत भांडलो की आई म्हणते, जवळच्या जयपूर गावातील एका मुलाने त्याच्या शेतकरी वडिलांकडे पैसे मागितले. पैसे न देऊ शकल्याने त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून आता मी बाबांकडे पैसे मागत नाही. साहेब अनुदानाचे पैसे लवकर द्या, मग आई दिवाळीला पुरणपोळ्या बनवेल. तुम्ही सुद्धा पोळ्या खायला या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *