कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा अन्यथा; दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं असेही फडणवीस म्हणाले. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था नीट राखली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा

काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *