सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह कुणाचं, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाबाबतची पुढील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे  यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने कोणाला दिलासा नाही तर युक्तिवादाचे कोर्ट बदललेलं आहे. आत्तापर्यंत जे सर्वोच्च न्यायालयात होत होतं, ते आता निवडणूक आयोगासमोर होणार आहे.तिथे युक्तिवाद सुरू राहील. सगळं काही जनतेच्या समोर होत आहे. निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचाही विजय होणार.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *