सरकारला जनाची नाही मनाची तरी आहे का?असं अनेकदा सभागृहात बोललं जातं – अजित पवार

२३ डिसेंबर २०२२

नागपूर


अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ दोन वेळा मुंबईचे महापौर होते. ते अनेक वर्षांपासून आमदार आहेत. त्यांना मुंबईची खडा न् खडा माहिती आहे. मुंबईबद्दल बोलताना त्यांनी मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असं म्हटलं. त्यावरच विरोधकांनी गोंधळ घातला. मला वेळ मिळाला तर मुंबईबद्दल कोण काय म्हणाले याची कागदपत्रच काढेल. असे अजित पवार यांनी सांगितले.

आज खालच्या सभागृहात उपस्थित राहायचे की नाही याबाबत आमची चर्चा होईल. सभागृहात जायचं ठरलं तर ज्या विषयाला अग्रक्रम देण्याची गरज आहे, त्यावर आम्ही भर देऊ. नाही तर आमचा वॉक आऊट राहील, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशी उपमा दिली आहे. योगेश सागर यांनीही ही उपमा दिली आहे. प्रवीण दरेकर यांनीही तसा उल्लेख केला आहे. असं असतानाही त्यांनी गोंधळ घातला. सभागृह थांबवण्याचा प्रयत्न केला. असे पवार म्हणाले.

सरकार निर्लज्जासारखं वागतं. सरकारला जनाची नाही मनाची तरी आहे का? असं अनेकदा सभागृहात बोललं जातं. पण हे लोक सोयीचं राजकारण करत आहेत, जयंत पाटील हे गेली ३२ वर्ष सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांचं वागणं बोलणं सर्वांना माहीत आहे. त्यांचा स्वभावही सर्वांना माहीत आहे. निर्लज्जासारखं काम सुरू आहे, असं काल ते म्हणाले. पण ते अध्यक्षांना उद्देशून म्हणाले नाही. असे म्हणत जयंत पाटलांविषयी अजित पवार यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *