शिवसेना संपवायच्या कटकारस्थानाला उद्धव ठाकरे बळी पडले – दीपक केसरकर

०३ डिसेंबर २०२२


राज्यातज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरयांनी भाष्य केले. शिवसेना संपवायच्या कटकारस्थानाला उद्धव ठाकरे बळी पडले, अशी टीका केसरकर यांनी केली आहे.

केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही आमदारांना कधी प्रेम देऊ शकला नाही भेटू शकला नाही. तुम्हाला हिंदुत्व सुद्धा मान्य नव्हतं तुम्हाला सावरकरांचा झालेला अपमान मान्य होता. मात्र, बाळासाहेब असते तर त्यांना हे सर्व मान्य झालं नसतं. म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले. मागे राहिलेल्या लोकांनाही हे सत्य लवकरच समजेल. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कटकारस्थान होते, त्याला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वाफादर म्हणून तुम्ही काहीही बोलला, तरी आम्हाला फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *