जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती – गुलाबराव पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.

शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती. असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढलाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *