आपली बाजू कमजोर असेल, तेव्हा घटनात्मक संस्थांवर आरोप करण्याची शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत आहे – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


आपली बाजू कमजोर असेल, तेव्हा घटनात्मक संस्थांवर आरोप करण्याची शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत आहे. या संस्था कमजोर करण्याचे हे प्रयत्न असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली आहे. शिवसेना नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी आयोगावर आरोप केले आहेत. त्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेने जेवढा वेळ मागितला, तेवढा वेळ आयोगाने दिला. अनेकदा अशी विनंती करण्यात आली होती, पण वेळ काढून कायदेशीर प्रक्रिया टाळता येत नाही. त्याला सामोरे जावेच लागते.

न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, की ते उत्तम, पण मनाप्रमाणे निर्णय दिला नाही की टीका करायची, अशी यांची भूमिका आहे. गेल्या काही वर्षांत अन्य राज्यांमध्ये वेगवेगळय़ा पक्षांमध्ये फूट पडली, तेव्हा आयोगाने अशाच पद्धतीने निर्णय दिला आहे. या प्रकरणातही तोच न्याय देण्यात आला असून आयोगाविरोधातील रडगाणे राजकीय आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *