अर्थसंपदा पतसंस्थेकडून निराधार कुटुंबांना किराणा वाटप

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२४ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव व परिसरात अल्पावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अर्थसंपदा पतसंस्थेतर्फे निराधर कुटुंबांना त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ५१ कुटुंबांना आज किराणा वाटप करण्यात आले. समाजामध्ये दार्तुत्वाची भावना निर्माण व्हावी, समाजामध्ये संस्कारक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे, त्याचप्रमाणे समाजामध्ये अर्थकारण करत असताना आपलाही काही वाटा समाजाच्या कल्याणासाठी आपण वापरला पाहिजे असे ह. भ. प. शोभाताई तांबे यांनी सांगितले.


अर्थसंपदा पतसंस्थेची वाटचाल समाजाचे कल्याण करत असताना संस्था वाढवण्याचे काम रमेश मेहेत्रे व त्यांचे संचालक मंडळ करत आहे असे वारूळवाडीच्या उपसरपंच ज्योती संते यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच जंगल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एम.डी. भुजबळ , विनायक भुजबळ ,सचिन भोर, वसंतराव कोल्हे , अनंत भोर, प्रकाश नेहरकर, वर्षा तांबे, निलेश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पानसरे यांनी केले. आभार रुपेश कानडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *