मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय – गुलाबराव पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे म्हणतानाच मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही ते जळगावमध्ये म्हणाले आहेत.
नागरिकांनी पाणीपट्टी नियमितरित्या भरली पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. राज्यात सरकारकडून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या योजनांसाठी बरेचदा नागरिक सहकार्य करत नाहीत, अशी नाराजी यावेळी गुलाबराब पाटलांनी बोलून दाखवली आहे.