आपल्या बाजूने निकाल दिला तर उत्तम अन्यथा; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवण्याचानिर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं याचिकेत शिवसेनेने म्हटलं आहे. याप्रकरणावती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेला पाहिजे तेवढी वेळ दिली. पण, वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कधीतरी त्याला सामोर जावं लागतं. आयोगाने अंतरिम निर्णय दिला आहे, अंतिम नाही. त्यामुळे एखादे प्रकरण कमजोर असते तेव्हा स्वायत्त संस्थावर हल्ला करायचा ही शिवसेना, काँग्रेसची पद्धत आहे. आपल्या बाजूनं निकाल दिला तर उत्तम अन्यथा संस्थाविरोधात बोलायचं, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.