हा गद्दार, तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत – अजित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


शिवसेनेतील नेते एकमेकांना गद्दार बोलतात, पण त्याने राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख नागरिकांचे रोजगार गेले, देशात महागाई वाढली आहे, यावर बोलायला कोणीच तयार नाही. माणसे फोडण्याचेच काम केले जात असून, लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे कोणते सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांनाही समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत आहे. हा गद्दार, तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *