मोदींनी नायजेरियातून आणलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला – नाना पटोले
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२
गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी झाला आहे. अशातच लम्पी या आजारावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा करत पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लम्पी आजार नरेंद्र मोदींनी भारतात चित्ते आणल्यामुळे झाला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले, असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.