आता शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील – गिरीश महाजन

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२


गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ५० पैकी ४० आमदार गेले. १८ पैकी १२ खासदार गेलेत. आता शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील असं वक्तव्य गिरीश मगाजन यांनी केलं आहे. एकनाथ शिंदेंसह काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत खरी शिवसेना आमची असल्याचा दावा केला.पक्षाच्‍या चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे

मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, “अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीशी शिवसेनेनंच खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत.परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *