रामदास कदमांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ सप्टेंबर २०२२
रविवारी रत्नागिरीमधील दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या मेळावा माजी मंत्री रामदास कदम यांनी घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन ही सभा पाहून माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या, सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला, म्हणत असतील असेही विधान रामदास कदम यांनी केलं होतं. आता रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रामदास कदम यांनी घेतलेली सभा राजकीय वैचारिकतेला छेद देणारी आहे. रामदास कदमांचे भाषण महाराष्ट्रात पाहिल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील.मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते, त्या जनतेकरता मुंबईत शौचालयांची व्यवस्था आहे. त्या शौचालयांतून जेवढी घाण बाहेर पडत नाही, तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांन केली आहे. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं, ते मी कॅमेऱ्यासमोर बालू शकत नाही, खासगीमध्येही त्याचा उल्लेख करू शकत नाही. ते विधान जेव्हा महाराष्ट्रातील लोकांच्या कानावर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्यानं पूजा होईल.