घटनाबाह्य मुख्यंमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा – आदित्य ठाकरे

२१ डिसेंबर २०२२


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी मविआ नेत्यांनी भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

नागपुरातील भूखंडवाटप प्रकरणावर खोके सरकार सारवासारव करताना दिसून येतंय, यावरून असंच दिसतंय ‘घेतले खोके, भूखंड ओके’! त्यामुळेच घटनाबाह्य मुख्यंमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *