जलयुक्त शिवार अभियान २.० होणार सुरु; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

१३ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी(१३ डिसेंबर) पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –

• जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

• जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता.

• महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी निर्गुन्हेगारीकरण करणार.

• राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता.

• महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत.

• राज्यातील १३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाकडून बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार

• पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना मान्यता.

• शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

• कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद.

• पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार.

• गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय.

• शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणार.

• राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

• आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.

• खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात ‘सुविधा संपन्न कुटुंब’ मिशन राबविणार.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *