उदयनराजे यांची रायगडावरून मोठी घोषणा; पुढचा मोर्चा आझाद मैदानात

०३ डिसेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली.

आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ. राज्यपालपदावर विराजमान असलेली व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल तर शिवरायांचा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आझाद मैदान लांब नाही. एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानावर जायचं. तेव्हा तयारीला लागा, असं म्हणत उदयनराजेंनी पुढच्या मोर्चाची घोषणा केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *