सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं – राहुल गांधी
१७ नोव्हेंबर २०२२
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोल्यात आली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ही कागदपत्रं माझ्याकडे आहेत. सावरकरांचं इंग्रजांना लिहिलेलं हे पत्रं आहे. इंग्रजीत लिहिलं आहे. सर, मै आपका नोकर रहना चाहता हूँ. हे मी म्हटलं नाही. तर सावरकर यांनी म्हटलंय. फडणवीसांना वाचायचं असेल तर त्यांनी हे पत्रं वाचावं असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं. सरकारला जर वाटलं ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी असेही गांधी म्हणाले. आम्हाला भारत जोडायचा आहे. आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली आहे. आता आम्हाला श्रीनगरपर्यंत जायचे असल्याचं गांधी म्हणाले.