बाप पळवणारी टोळी सध्या महाराष्ट्रात फिरतेय; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२२ सप्टेंबर २०२२


एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं. यावेळेस ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी गटाचा उल्लेख मिंधे गट असा केला. यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर कोण गेलं? मिंधेपणा कोणी केला हे सर्व महाराष्ट्र आणि देश बघतोय, तसेच उद्धव ठाकरेंनी आस्मान दाखवण्यासंदर्भात केलेल्या विधानालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही आता आसमान दाखवू. कोणाला तर आम्हाला आसमान दाखवणार. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आसमान दाखवण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही, कारण आम्हीच तुम्हाला तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे.

मुलं पळवणारी टोळी माहिती आहे. पण बाप पळवणारी टोळी सध्या महाराष्ट्रात फिरतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले, यालाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.आम्हाला म्हटलं बाप चोरणारी टोळी. खरं म्हणजे आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे असं आम्ही म्हणायचं का?” असा प्रश्न शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.आम्ही टीका करणार नाही. आम्ही कामाने तुम्हाला उत्तर देऊ. असं एकनाथ शिंदे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *