काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र,अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२२ सप्टेंबर २०२२


उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या गटनेता मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ही आपली पहिली निवडणूक आहे असं मानून सगळ्यांनी संपूर्ण ताकदीनं लढा. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र, जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठित तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या? असं फडणवीस म्हणाले. तुम्हीतिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *