आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींनाच घाबरलो नाही; देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका
३१ डिसेंबर २०२२
नागपूर
आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींनाच घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून ५० लोक निघून आले अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केली आहे. ते अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्याकडे नागपूरमध्ये एक म्हण आहे नाखून कटाके शहीद बनना, अशा प्रकारचा हा विषय आहे. त्यांच्या पूज्य पिताश्रींना पण आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून ५० लोक निघून आले. मुंबईला आग लागेल अस म्हंटल होते. पण, साधी माचीसची एक काडी पण पेटली नाही, अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.
इंद्रजींसारख्या अतिशय पावरफुल असलेल्या नेतेदेखील निवडणुकीमध्ये हरलेले आपण बघितलेले आहेत आणि २०१४ सुप्रिया सुळे देखील बराच काळ मागे होते आणि शेवटी कमी मताने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळेंनी त्या ठिकाणी लक्ष ठेवू नये आणि मिशन बारामती आहेच. पण, केवळ मिशन बारामती नाही मिशन महाराष्ट्र आहे. ते मिशन महाराष्ट्रामध्ये बावनकुळे बारामतीमध्ये गेल्यामुळे अजित पवार यांना फार राग आलेला दिसतो आहे. पण, आम्ही त्यांना समजावून सांगू की असं नाही आम्ही सगळीकडे जातोय, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. तसेच लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते अशी तुका उद्धव ठाकरेंवर केली आहे.