महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत – भास्कर जाधव

२६ डिसेंबर २०२२

नागपूर


राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत आज ठराव मांडायला हवा होता असं सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली. यावर भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर टीका केली.

भास्कर जाधव म्हणाले की, सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघङड्या डोळ्याने पाहायचं का?


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *