नैरोबी, केनियामध्ये जर ग्रामपंचायत निव़डणुका झाल्या, तर तिथंही भाजपा दावा करेल – संजय राऊत

२० डिसेंबर २०२२


राज्यातल्या ७७५१ निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाच जिंकेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, त्यावरुनच आता संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “ग्रामपंचायतीचा दावा कधीच कुणी करू नये. कारण जिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात, तिथेच पक्षांनी दावा करावा. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढवल्या जातात, हे आता काही नव्याने सांगण्याची गरज नाही. नैरोबी, केनियामध्ये जर ग्रामपंचायत निव़डणुका झाल्या, तर तिथंही भाजपा दावा करेल, तिथंही आम्ही निवडून आलो, असं म्हणेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *