बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताकडे पहिल्या डावात २५४ धावांची भक्कम आघाडी
१६ डिसेंबर २०२२
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात १५० धावांवर गुंडाळलं. यासह भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात २५४ धावांची आघाडी मिळवली आहे. चेतेश्वर पुजारा (९०) आणि श्रेयस अय्यर (८६) यांच्या अर्धशतकांच्या मदतीनं भारतानं पहिल्या डावात ४०४ धावा पर्यंत मजल मारली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलनं नाणेफेक जिंकून बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.