वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर काय कारवाई करणार? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

१५ डिसेंबर २०२२


सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असून, यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आहे. याशिवाय भाजपानेही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार? असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि मग त्यांना जे जे लोक प्रिय होऊ लागले, त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समजावादी पार्टी, कम्युनिस्ट तसेच हिंदुत्व विरोधी असलेल्या सुषमा अंधारे या त्यांना जवळच्या वाटायला लागल्या, त्यामुळे आमचा सवाल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला आहे, की तुम्ही सुषमा अंधारेंची हकालपट्टी करणार का? तुम्ही सुषमा अंधारेंवर कारवाई करणार का? उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची त्यांना विनंती आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *