अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट
१३ डिसेंबर २०२२
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ नुकतीच ही झटापट झाली. ९ डिसेंबरला घटना घडली आहे. दोन्ही बाजूने झालेल्या या झटापटीत एकूण 30 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.