भारत-न्यूझीलंड सामन्याला पावसामुळे विलंब
१८ नोव्हेंबर २०२२
भारत आणि न्यूझीलंड संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहेत. दोन्ही संघांमध्ये आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार होती, पण पावसामुळे सामन्याला विलंब झाला आहे. त्यामुळे टॉसदेखील झालेला नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करत असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे. या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना पाठवण्यात आलेले नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत युवा खेळाडूंना या दौऱ्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे.