शिवसेनेने २०१४ मध्ये चार जागांसाठी युती तोडली – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


शिवसेनेने २०१४ मध्ये फक्त चार जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने बेईमानी केली, पण अमित शाह यांच्या रणनीतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली असं ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. अचानक युती तुटल्यानंतर वर्षानुवर्ष ११७ जागा लढणारा भाजपा, एका दिवसात २८८ जागा लढण्यास तयार झाला. याचं एकमेव कारण म्हणजे अमित शाह आपल्या पाठीशी उभे होतेअसं फडणवीसांनी सांगितलं.

अमित शाह यांच्या नेतृत्वात आपण उत्तम प्रकारे निवडणूक लढलो. दोन-अडीच महिने ते महाराष्ट्रात राहिले. याच कार्यालयात ते मुक्काम करायचे, दिवस घालवायचे. निवडणुकीत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली. शिवाय निवडणुकीतील अनेक गोष्टी, तंत्र त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्यातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात भाजपाचं स्वत:चं सरकार आपण पाहिलं. यामध्ये अमित शाह यांचा सिंहाचा वाटा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *