जितेंद्र आव्हाडांकडे आदर्श आमदार म्हणून बघितलं जातं – सुप्रिया सुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा झाला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ७२ तासात दोन खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचं सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली.यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुप्रिया सुळे म्हणाले, माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. मंत्री असो किंवा नसो, मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली.

राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. हे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही, तर राजकीय क्षेत्रातील सर्व लोक म्हणून याकडे माणूसकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *