दहावी,बारावीच्या परीक्षांबाबत सहा मोठे बदल
१४ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला असून, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती, विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय.एस.दाभाडे यांनी सांगितले.
यापुढे होणार असा बदल –
१. २०२३ मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.
२. यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.
३. तसेच ८० गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.
४. ६०-४० गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
५. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी २५% अभ्यासक्रम वगळला होता)
६. मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.