राज्यातील सरकार बदलले असून आता मुंबईही बदलणार – एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असून राज्याला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. राज्यातील सरकार बदलले असून आता मुंबईही बदलणार असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू असून हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. केवळ तीन महिन्यांत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याला भारतातील सर्वात विकसित राज्य म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी, असे आवाहनही त्यांनी या वेळी विकासकांना केले. राज्यातील सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार असल्याचे सांगताना शिंदे यांनी पुढील दोन-अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते पूर्णपणे काँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही, असे सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *