भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील १६ किमीचा प्रवास राहुल गांधी कारने करणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून झाली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होत आहे. मात्र, राहुल गांधी वाशिममधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करतांना मेडशी ते पातुरदरम्यानचा यात्रेचा १६ किलोमीटर प्रवास कारने करणार आहे. मेडशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी त्यांना कारमधून प्रवास करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधींना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा आहे. राहुल गांधींनीही सुरक्षेची गोष्ट लक्षात घेता ती विनंती मान्य केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *