मुख्यमंत्री कार्यालयात फक्त दुपारी २ ते ४ पर्यंत नागरिकांना प्रवेश
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२
मंत्रालयातील वाढती गर्दी रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आता २ ते ४ याच वेळेत नागरिकांना भेटता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी चार दरवाजापैंकी तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तर एका दरवाजातून प्रवेश आहे मात्र तिथे ही अधिकारी आणि मुख्यमंत्री यांनाच प्रवेश आहे. मंत्रालयाच्या गेटवरती ही आता कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.