भारताचं बांग्लादेशसमोर १८५ धावाचं आव्हान

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


टी20 विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत १८४ धावा केल्या आहेत. विराट आणि के ल राहुलनं अर्धशतक ठोकल्यामुळे भारतानं ही धावसंख्या उभारली आहे. केएल राहुलनी ५० धावा केल्या तर विराट कोहली ने नाबाद ६४ धावा केल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला मात दिली असून बांगलादेशनही दोन विजय मिळवले आहेत. दोघांना प्रत्येकी एक सामना गमवावाही लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर १२ मधील चौथा सामना आज खेळत आहेत. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा सामना महत्त्वाचा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *