ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा – छगन भुजबळ

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा कमी केलीय तर काही नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरक्षा काढली या बाबत काही ही बोलणार नाही आरोप करणार नाही. मी गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. मला अनेक अडचणी आल्या. दाऊदसारख्या कित्येकांना मी अंगावर घेतलंय. ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा, असं भुजबळ म्हणालेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे या नेत्यांची सुरक्षा काढली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *