राष्ट्रवादीमुळे देवेंद्र फडणवीस सत्तेत आले – पृथ्वीराज चव्हाण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


२०१४ मध्ये आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीने अचानकपणे पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडलं. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार एकप्रकारे राष्ट्रवादीमुळेच आलं, असा टोला तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

चव्हाण म्हणाले, की राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी कॉग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळय़ांना समजले, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *