खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२


बल्क ड्रग पार्क, फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा टाटा एयरबस प्रकल्प गुजरातलं होणार आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आणखी एक महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *