गोरगरिबांना शिक्षण मिळू नये हे भाजपचे धोरण आहे – नाना पटोले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचे कारण देऊन राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट शिंदे-फडणवीस सरकारने घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बहुजन समाजातील गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गातील मुलांना पुन्हा शिक्षणापासून वंचित ठेवण्याची ही मनुवादी प्रवृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागांत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेडय़ातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील, काँग्रेस पक्ष हे कदापि मान्य करणार नाही.गुजरातमधील भाजप सरकारने ६ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महाराष्ट्रात १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. गोरगरिबांना शिक्षण मिळू नये हे भाजपचे धोरण आहे असं नाना पटोले म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *