कोविड महामारीच्या काळात मोदी सरकारने पाठवलेल्या तांदुळाची महाविकास आधाडी सरकारच्या काळात चोरीमारी झाली – चित्रा वाघ
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या तसेच आपल्या ट्वीटमुळे समाज माध्यमांतून सतत चर्चेत असणाऱ्या चित्रा वाघ यानी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकासआघाडीवर टीका केली आहे.
कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने गरिबांना दाणाही दिला नाही शिवाय मोदी सरकारने पाठवलेल्या तांदुळाची महाविकास आधाडी सरकारच्या काळात चोरीमारी झाली…हा डाटा ठाकरेंच्या नेत्यांकडे दिसत नाही किंवा त्यांना दिला गेला नसावा, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केला आहे.
कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने गरिबांना दाणाही दिला नाही शिवाय मोदी सरकारने पाठवलेल्या तांदुळाची महाविकास आधाडी सरकारच्या काळात चोरीमारी झाली…
हा डाटा ठाकरेंच्या नेत्यांकडे दिसत नाही किंवा त्यांना दिला गेला नसावा@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @cbawankule
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 14, 2022