आशिया चषक २०२२ : पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला शुक्रवारी महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. निदा दारच्या नाबाद ५६ धावा व २ बळी अष्टपैलू खेळामुळे पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय संघाची या स्पर्धेतील आणि पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका खंडित झाली.

भारताने यंदाच्या स्पर्धेतील सलग तीन सामने जिंकले होते. तसेच या दोन संघांमधील गेल्या पाचही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताने विजय नोंदवला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताच्या फलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या. भारताची एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १३७ अशी धावसंख्या केली आणि प्रत्युत्तरात भारताचा डाव १९.४ षटकांत १२४ धावांत आटोपला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *