पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही; प्रकाश आंबेडकरांची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे

दाडू इंदुरीकरांच ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि शरद पवारांमध्ये नाही, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली .देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *