सोनं नाही तर भंगार लुटलं; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रसाद लाड यांची टीका
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपनं टीका केली आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून ‘सोनं नाही तर भंगार लुटलं’ असा टोला लगावला आहे.
टोमण्यांच्या पलीकडे या भाषणात काहीच नव्हतं. मी टोमणे मारतोय का हे त्यांना वारंवार विचारावं लागत होतं. जो टोमणे मारतो त्याला विचारावं लागत नाही. या भाषणात टोमणे आणि अहंकाराच्या पलीकडे काही नव्हतं.जनतेला कोणतंही सोनं मिळालं नाही. सोन्याच्या रुपात पितळही मिळालं नाही. ना चांदी मिळाली, ना पितळ मिळाल, फक्त भंगार मिळालं. भंगारवाल्यांसह सत्तेत राहिल्याने भंगारच लुटायची वेळ आली आहे. भंगारच लुटायचं काम त्यांनी केलं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला.