मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी झोपाच काढल्या – चंद्रकांत पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तर फक्त झोपाच काढल्या, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
शिवसेनेचे अडीच वर्षांत काहीच केले नाही. २०१९ मध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात सर्वश्रुत आहे. २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत विजय मिळवला, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणे सुरू केले आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी झोपाच काढल्या, दुसरे काही केले नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दसरा मेळाव्यावरून शिवसेनेत सुरू असलेल्या वादाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. त्यांच्या पक्षांची चिंता त्यांनी करावी. आमच्या पक्षाची चिंता आम्ही करू.