अधीश बंगला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा नारायण राणेंना मोठा धक्का
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यामूर्ती अभय ओक यांच्या पीठासमोर ही याचिका होती. मुकुल रोहतगी यांनी नारायण राणेंची बाजू मांडली.
सुप्रीम कोर्टाने राणेंची याचिका फेटाळताना अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम तीन महिन्यात पाडण्याचे आदेश राणेंना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तीन महिन्यांमध्ये तुम्ही स्वत: हे बांधकाम काढा. जर नियमानुसार केलं नाहीतर पुढील कारवाईसाठी बीएमसीला मुभा असेल.