बारामतीमधील घराणेशाही संपवली तर बारामतीचा विकास होईल – निर्मला सीतारामन
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष आहे. राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीचीच परंपरा आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. घराणेशाहीमुळेच काँग्रेसची अवस्था बिकट झाली, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान विरोधकांच्या जिल्ह्यातही प्रगतीच्या योजना पोहोचवित आहेत. भाजपा कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधींना विकासासाठी निधी दिला जात नाही. बारामतीमध्ये एकाच ठिकाणी प्रगती झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील अन्य भागाकडे दुर्लक्ष आहे, तशा तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. बारामतीमधील भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात आता भाजपा काम करणार आहे. बारामतीमधील घराणेशाही संपविली तर बारामतीचा विकास होईल, असे सीतारामन यांनी सांगितले