बाळासाहेब वारुळे यांचे निधन

नारायणगाव
११ मे २०२२


वारूळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी, द्राक्ष बागायतदार तसेच उद्योजक बाळासाहेब ज्ञानेश्वर वारुळे (वय ७९ वर्ष) यांचे आज मंगळवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संजय व नितीन वारुळे यांना पितृशोक

नारायणगाव येथील हॉटेल निलायमचे संचालक संजय वारुळे व नितीन वारुळे यांचे ते वडील होत. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी ९ वाजता वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील मीना नदीतीरावर होणार आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *