बिगर आदिवासी समाज हा आमचा बांधव आहे त्यांना या आदिवासी समाजाप्रमाणे अनुसूची क्षेत्रातील सवलतींचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून न्याय मिळवून देणेसाठी पाठीशी -सभापती सुभाषराव मोरमारे

आंबेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
पेसा क्षेत्रात कायम वास्तव्यास असलेल्या व पारंपरिक रहिवासी असलेल्या बिगर आदिवासी समाज हा आमचा बांधव आहे त्यांना या आदिवासी समाजा प्रमाणे अनुसूची क्षेत्रातील सवलतींचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून न्याय मिळवून देणेसाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन आदिवासी नेते व मा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे यांनी केले…

शिनोली ता आंबेगाव येथे पेसा हक्क कृती समितीची बैठक सुभाषराव मोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते की आदिवासी भागातील सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात कोणतेही मतभेद नसून संविधानाने दिलेल्या अधिकारा नुसार प्रत्येक समाजाला आपला हक्क मिळाला पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या बरोबरीने सरकार दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन मोरमारे यांनी दिले या वेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपालीताई जगदाळे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले,मा जिल्हापरिषद सदस्य व आदिवासी समाजाचे नेते विजय आढारी, खरेदी विक्री संघाचे मा अध्यक्ष मधु(अप्पा)बोऱ्हाडे ,राष्ट्रवादी काँग्रेस (आदिवासी सेल) चे तालुका अध्यक्ष व सरपंच संदीप चपटे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते

या वेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी आदिवासी व बिगर आदिवासी असा भेदभाव नसून ही कायद्याची लढाई आहे पेसा हक्क कृती समितीचे मागणी रास्त असून आपण सगळेजण कायद्याचा अभ्यास करून टिपण्णी तयार करून राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्फत राज्यपाल याना भेटून नवीन अध्यादेश राज्यसरकार कडून काढून न्याय देण्याचे काम करू

तर शिवसेना नेते मा जिल्हा परिषद सदस्य विजयराव आढारी यांनी पेसा हक्क कृती समितीचा लढा हा संविधानिक व न्यायिक आहे मानवतावादी दृष्टीकोनातून अनुसूची क्षेत्रात रहाणाऱ्या बिगर आदिवासी समाजाला राजकीय,नोकरीमध्ये,योजनांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही पेसा हक्क कृती समितीच्या बरोबरीने शासन दरबारी पाठपुरावा करू…

या प्रसंगी अनुसची क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रथम स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस गणोपत ढेरंगे यांनी केले प्रास्ताविक युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पेसा हक्क कृती समितीचे सचिव गौतम खरात यांनी केले सूत्रसंचालन टी एस नागरी पत संस्थेचे व्हा चेअरमन व पेसा हक्क कृती समीचे खजिनदार पुरुषोत्तम फदाले यांनी केले

तर आभार पंचायत समितीचे मा उपसभापती नंदकुमार सोनावले यांनी मानले कृती समितीचे सल्लागार हुसेन शेख उपाध्यक्ष अमोल अंकुश ,विलास बोऱ्हाडे जेष्ठनेते सिताराम लोहट युवा नेते अक्षय साळवे,जिल्हा परिषद सदस्य रुपालिताई जगदाळे, मा उपसभापती सलीमभाई तांबोळी पेसा हक्क कृती समितीच्या महिला तालुका अध्यक्षा कलावती पोटकुले सल्लागार आत्माराम बोऱ्हाडे गोरक्षनाथ पोखरकर यांनी मनोगते व्यक्त करून न्याय मिळणेची मागणी केली
यावेळी प्रसिद्ध निवेदक प्रकाश बोऱ्हाडे,शरीफ पटेल,अनिल लोहट,सतीश बोऱ्हाडे सोपान फलके, भरत फदाले, जिजारांम येवले,दिलीप घुले ,खंडू थोरात, जयंत जगदाळे, बाळासाहेब आवटे ,शंकरशेठ शहा,विश्वनाथ लोहट कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक दत्तात्रय वावरे ,सुजित फाले,अरुण अंकुश रमेश देठे किरण खरात संजय बोऱ्हाडे सुरेंद्र फदाले, हनिफ इनामदार, आशिष भालेराव लक्ष्मण वागदरे आदी शेकोडो कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते
या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *