नारायणगाव येथे विठाई साबिर कुंजचे दिमाखात झाले उद्घाटन…
ओझर प्रतिनिधी:मंगेश शेळके
दि.१६ ऑगस्ट (ओझर): नारायणगाव येथे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या फंडातून हवेली आळी येथे भव्य दिव्य असे विठाई साबिर कुंज गार्डन लहान मुलांसाठी उभारण्यात आले .
विशेष बाब म्हणजे या “विठाई साबिर कुंज” गार्डनचे उद्घाटन सर्व उपस्थित बालचमूंच्या हस्ते “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” ,” “जय शिवाजी जय भवानी”अशी गर्जना करत रिबीन कापून करण्यात आले. अतिशय धुमधडाक्यात या “विठाई साबिर कुंज” गार्डन चे उद्घाटन करण्यात आले. तसेच येणाऱ्या प्रत्येक बालचमूस एक ड्रॉईंग बुक व कलर बॉक्स ,फुगे वाटप या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या तोंडावरचा आनंद भरभरून वाहताना दिसत होता. लहान मुलांना खेळण्यासाठी या गार्डनमध्ये घसरगुंडी ,झोका, मुख्य आकर्षण पाण्याचे कारंजे व अद्ययावत खेळण्यांचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी नारायणगाव ग्रामपंचायतचे सरपंच बाबुभाई पाटे उपसरपंच पुष्पाताई मेहेर , नितीन नाईकडे, आरिफ आतार ,संतोष पाटे ,अनिता कसाबे, मनिषा मेहेर संतोष दांगट ,ज्योती दिवटे, अश्विनी ताजणे ,संगीता खैरे ,राजेश बाप्ते ,रुपाली जाधव, सुप्रिया खैरे ,रामदास अभंग, गणेश पाटे ,सारिका डेरे, कुसुम शिरसाट, ज्ञानेश्वर औटी भागेश्वर डेरे ,आपला आवाज चे कार्यकारी संपादक किरण वाजगे , आपला आवाज चे पत्रकार मंगेश शेळके, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश निमसे परिसरातील सर्व व्यापारी वर्ग ,सर्व नागरिक ,लहान मुले व सर्व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.