निवडणुकीत ट्राफिक मुक्तीचे दिलेले आश्वासन आज पुर्ण केले – आमदार अतुल बेनके

खेड(राजगुरूनगर)
किरण वाजगे
दि.17/07/2021

आज पुणे नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण मार्गाचा अधिकृत उदघाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आपल्या विभागाचे संसदरत्न खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या हस्ते या बाह्यवळण मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सभापती संजयराव काळे, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, शरदराव लेंडे, आशाताई बुचके, मोहितशेठ ढमाले, अंकुशशेठ आमले, सभापती विशाल तांबे, अमोल लांडे, गणपतराव फुलवडे, भाऊसाहेब देवाडे, राजश्रीताई बोरकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून नारायणगाव शहरातील अंतर्गत महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. याविषयी अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या होत्या. रुग्णवाहिका वाहतूक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतमाल वाहतूक समाजातील प्रत्येक घटकाला या वाहतूक कोंडीचा फटका बसत होता. या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण आंदोलनही केले होते. यासंबंधी खा.अमोल कोल्हे यांनी योग्य पद्धतीने सातत्याने लोकसभेत आवाज उठवला व पाठपुरावा करून नारायणगावकरांना निवडणुकीत दिलेले ट्रॅफिक मुक्त रस्त्याचे आश्वासन पूर्ण केलेव
निवडणुकीत दिलेला शब्द आम्ही पाळला असे विधान आमदार अतुल बेनके यांनी केले…

जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी खासदारांचे याप्रसंगी आभार मानतो. यापुढेही जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या कामांसंबंधी कटिबद्ध असा शब्द या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना दिला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *